।। श्रीः।।

श्री दक्षिणामूर्ति भगवान यांच्या कृपेने व सर्वांच्या सहभागाने मंडळ आपले १०५ वर्ष साजेर करीत आहे. ही आपल्याकरिता अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरीता समाजाचे संघटन व जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उत्सव देशात प्रारंभ केला व हेच व्रत आपल्या पूर्वजांनी शिरोधार्य मानून १९२० साली आपल्या मंडळाची स्थापना केली.

॥ श्री दक्षिणामूर्ति भगवान ॥

आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गणेश बाळाभाऊ शेट्ये यांनी आपल्या राहत्या घराच्या ओसरीत याची छोटीशी सुरूवात केली, त्याचे आज भव्य रूप आपण पाहतो आहे. संस्कृती व संस्कार संवर्धन या द्विसूत्रीवर मंडळ १०५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे, ज्यात राष्ट्र प्रेम, समाज जागृती व सामाजिक बांधीलकी उत्तरोत्तर वाढेल असे सर्व उपक्रम मंडळ करीत आहे.

आपल्या मंडळाला महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास, श्रीमंत बाबुराव देशमुख, गोविंदराव देशपांडे यासारख्या महनीय व्यक्तिंचा आशिर्वाद व सहवास लाभला आहे. आरतीनंतर म्हटल्या जाणारी राष्ट्रीय प्रार्थना हे मंडळाचे वैशिष्ठय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याची रचना केली आहे. या प्रार्थनेच्या ओळी रोमरोमात राष्ट्रप्रेम जागे करते.

श्री दक्षिणामूर्ति मंदिर, महाल, नागपूर (१२५ वर्षे पुरातन मंदिर)

श्री दक्षिणामूर्तये नम:

भाविकांनी भारतवर्षात वेदवेदांताचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करणारे, आपल्या नागपूरातील श्री दक्षिणामूर्ति मंदिर शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. ऐतिहासिक राजमान्य धर्ममान्य देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे.

दिनांक १३ फेब्रुवारी १८९८ माघ शुध्द त्रयोदशीला काशीच्या सहस्त्र ब्राम्हणांच्या वेदघोषात अतिरुद्राच्या अधिष्ठानाने आपल्या नागपुरातील महाल विभागात श्री दक्षिणामूर्ति तसेच भगवती बाला त्रिपुरा सुंदरी यांची स्थापना झाली. लोकमान्य बाळगंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. हेडगेवार, प.पू. श्री गुरूजी, भगिनी निवेदिता, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पदस्पर्शान राष्ट्रकिर्ती झालेले तसेच संत गजानन महाराज, श्रृंगेरीपीठाचे शंकराचार्य अभिनव विद्यातिर्थ स्वामी, कांचीपीठाचे श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी व श्री जयेंद्र सरस्वती स्वामी, देवनाथ मठाचे मारोतीनाथ महाराज यांच्या चरणस्पशनि पवित्र केलेल्या या मंदिराचा ज्ञानमय गाभारा भक्तिच्या व ज्ञानाच्या नंदादिपाने अखंड तेवत आहे.

मंदिराचे संस्थापक रा.रा. श्री सद्‌गुरू नारायण महाराज यांनी घालून दिलेल्या पीठपरंपरेला त्यांचे सुपुत्र ह.भ.प. व्यंकोबा महाराजांनी किर्ती कळस चढविला, किर्लोस्करी गायकीने चौदा भारतीय भाषांमध्ये आसेतुसेतु पर्यंत वेदांताचा कीर्तन स्वरूपात प्रचार केला. त्यांचे दोन पुत्ररत्न म्हणजे श्रीमंत अग्निहोत्री बाबुराव महाराज व महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास. बाळशास्त्रींचे नाव न जाणणारा एकही तत्काली शोधूनही सापडायचा नाही. एकूण भारतभर प्रखर हिंदुत्वाचा प्रचार केला, अनेक पुस्तके लिहिली, पुढे चार पिढ्या जोपासल्या गेलेली परंपरा आजही अविरत सुरू आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (३०० वा जयंती वर्ष)

इसलिए कहलाई लोकमाता

अहिल्या (1737 से 1795) ने मालवा की रानी के रूप में 28 साल तक शासन किया। अहिल्याबाई के शासनकाल में सम्पूर्ण प्रजा सुख और शान्ति तथा समृद्धि से खुशहाल थी। इसलिए लोग उन्हें लोकमाता कहते थे। उन्होंने हमेशा अपने राज्य और अपने लोगों को आगे बढ़ने का हौंसला दिया. ओंकारेश्वर पास होने के कारण और नर्मदा के प्रति श्रद्धा होने कारण उन्होंने महेश्वर को अपनी राजधानी बनाया था।

अहिल्याबाई होळकर का जन्म वर्ष 31 मई 1725 को महाराष्ट्र राज्य के चौंढी नामक गांव जामखेड़, अहमदनगर में हुआ था। वह एक सामान्य से किसान की बेटी थीं। उनके पिता माणकोजी शिन्दे एक सामान्य किसान थे। सादगी और घनिष्ठता के साथ जीवन व्यतीत करने वाले मनकोजी की अहिल्याबाई अपने पिता कि इकलौती संतान थीं। अहिल्याबाई बचपन में सीधी-सादी और सरल ग्रामीण कन्या थीं। अहिल्याबाई होलकर भगवान शिव की भक्त थीं और हर दिन शिव मंदिर में पूजन करने जाती थीं।

Name

Position

Name

Position

Description for this block. Use this space for describing your block. Any text will do. Description for this block. You can use this space for describing your block.

Name

Position

Description for this block. Use this space for describing your block. Any text will do. Description for this block. You can use this space for describing your block.

Translate »
× How can I help you?